Sunday 3 July 2011

गर्भाधान संस्कार



‘गर्भाधान’
       हे अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे कर्तव्य आहे. हा संस्कार पतीने भार्येच्या ठिकाणी करावयाचा असतो. हा संस्कार मुख्यतः पतीपासून भार्या (पत्निच्या) ठिकाणी  पुढे होणार्‍या संततीचा आहे. म्हणून हा क्षेत्रसंस्कार. क्षेत्र म्हणजे बीज पेरण्याचे स्थान अर्थात गर्भाची स्थापना. गर्भाचे पोषण व वाढण्याची जागा. शेतकर्‍याने पेरणीचीच काळजी घेतली नाही, तर येणार्‍या पिकापासून लाभ संभवत नाही. त्यासाठी हा संस्कार महत्वाचा आहे. हा संस्कार रात्रीच करावयाचा असतो.
       हा संस्कार ऋतुकालाचे ठायी करावा. ऋतुकाल म्हणजे रजोदर्शन (मासिक पाळी) झाल्यापासून प्रथम सोळा रात्री होय.  त्यातील पहिल्या ४ व ११, १३ रात्री सोडून ज्या १० रात्री या संस्कारात प्रशस्त आहेत.
       चतुर्थ रात्री गमन (रतिक्रिया) केल्यास पुत्र होतो, पण तो अल्पायुषी व धनहीन होतो.
पंचम रात्री गमन केल्यास पुत्रवती कन्या होते. सहाव्या रात्री मध्यम पूत्र. सातव्या रात्री प्रजा न होणारी कन्या. ८व्या रात्री गमन केले असता ईश्वरतुल्य पूत्र, ९व्या रात्री गमन केले असता सूभग कन्या. १०व्या रात्री श्रेष्ठ पूत्र, ११व्या रात्री अधर्म करणारी कन्या, १२ पुरुषश्रेष्ठ, १३व्या रात्री वर्णसंकर करणारी कन्या. १४ धर्मवेत्ता कृतज्ञ पुत्र, १५ पतिव्रता कन्या, १६ सुखी पुरुष. असे सोळा रात्रीत गमन (संभोग) केला असता फळे सांगितली आहेत. ज्या नक्षत्री गर्भधारणा होते, त्याच्या दहाव्या नक्षत्री बालकाचा जन्म होतो.
       मूळ नक्षत्रापासून दहावे नक्षत्र अश्विनी. मघापासून १०वे नक्षत्र मूळ, रेवतीपासून दहावे नक्षत्र आश्लेषा. ही तीन नक्षत्रे जन्माला एकापेक्षा एक वाईट अशी आहेत.
हे सुप्रजानिर्माण शास्त्राचे गुढ रहस्य आहे. 
जर संस्कारानुरुप होमविधरपूर्वक गर्भाधान संस्कार केला नाही तरी लग्नसंस्कार झाल्यापासून ऋतुकालाचे योग्य दिवस निवडून आपल्या इष्टदेवता कुलदेवतांचे स्मरण करुन पत्नीच्या उजव्या बाजूच्या नाकपूडीत दूर्वा रस पिळतात. नाकावाटे पोटात रस जाणे यामागे आयुर्वेदिय उपचार असेल किवा दूर्वा ही वनस्पती सहज मिळणारी, यश देणारी आहे. सुख देणारी अश्वगंधा किवा दूर्वा रस पिळण्यास सांगितली आहे.
       आपल्या संस्कारात सुद्धा प्रत्येक संस्काराची बांधणी योग्य रितीने केली आहे.
       आता गर्भाधान संस्काराचा विचार केला तर प्रथम विवाहसंस्काराकडे जावे लागेल. विवाह झाला नववधू घरी आली. एकतर घरात ती नविन, सर्व माणसे नविन, तिला या घरात ओळखीचे वातावरण समजून घेण्यास सर्वांचा विश्वास संपादन करण्यास वेळेची गरज असते.
       काहि ठीकाणी गर्भाधान संस्कारात फळांची ओटी भरणे हा कार्यक्रम असतो. ऋतुकाल प्राप्त होतो. नंतर ओटी, दूर्वा रस या सर्व सोपस्कारात तात्वीक विचार केला असता २०ए २१ दिवसांचा कालावधी सहज जातो. या कालावधीत ओळख, विश्वास, सामंजस्य वाढते. व वरील संस्कार दोघांच्याही साहचर्याने निर्भयपणे होतो.

No comments:

Post a Comment