Saturday 23 July 2011

जातकर्म संस्कार

       प्रसुत झाल्यानंतर नालच्छेदनापूर्वी हा संस्कार करावा.
       या संस्काराचा मुख्यत्वे उद्देश हा आहे की गर्भाशयामध्ये असताना तेथील उदकाचे वगैरे पान करावे लागल्यामुळे जो दोष उद्भवला असेल त्याचे निरसन होऊन जन्मलेल्या बालकाची शारीरीक व मानसिक उन्नती होऊन आयुष्यवृद्धी व्हावी म्हणून सोने मध सोने मधात उगाळून रासायनिक औषध बालकाला चाटण करावे. देशेालानूसार नालच्छेदनापूर्वी हा संस्कार होत नाही पण नंतर सोने मध चाटण मात्र करता येते. बारशावेळीही करता येते. पाचव्या किवा सहाव्या दिवशी परंपरेनुसार षष्ठीपूजन होते. पाचवी (पाची) षष्ठीदेवीचे पूजन होते. या पूजनामध्ये विघ्नेश, जन्म देणारी षष्ठीदेवी आणि जिवंतीका यांचे पूजन होते. काही घराण्यात वाजती पाचवी (पाची) असते. प्रत्येक संस्कारात रितीरिवाज कुलपरंपरा यांचा पगडा असतो. काही ठिकाणी पाचव्या दिवशी बाळ बाळंतीण ज्या घरात असते. त्या घराबाहेर चारी कोपर्‍यात बाहरुन *काजरा* वृक्षाच्या खुंट्या मारतात. घरात अग्नि चूलीमध्ये रात्रभर पेटत ठेवतात. पहाटे सुर्योदयापूर्वी पूजा विसर्जित केली जाते.
या सर्वामागे ष्ष्ठीदेवी (सटवी) मुलाचे भाग्य लिहायला येते. तिचा रात्री जागर बाहेरील वाईट शक्तींचा त्रास जावा अशीच कल्पना दिसते.
       यापुढे जननाशौच समाप्तीनंतर अकरावे किवा बारावे दिवशी जन्मलेल्या बाळाला जन्मलेल्या वेळी नक्षत्रदोष वगैरे असेल तर शांती विधी करावा किवा बाळ बाळंतीणीची तब्येत पाहुन यथावकाश शांतीकर्म करावे.

नामकरण संस्कार (बारसे)
आयुष्याची वृद्धी होऊन व्यवहार सुरळीत चालणे असा नामकरण संस्कार करण्याचा उद्देश आहे.
काही ठिकाणी गणपतीपूजन पूण्याहवाचन वगैरे विधी करतात.
कुळाचार, परंपरा यांना अनुसरुन मुलाचे बारसे १२व्या दिवशी मुलीचे बारसे १३व्या दिवशी करतात.
यामध्ये पाळणा सजवून सौभाग्यवती स्त्रिया, मुलाची आत्या वगैरे नाव ठेवतात.
नाव ठेवणे यामध्ये कुलदेवता नाम, मास नाम, नाक्षत्र नाम, व्यवहारासंबधी नाम अशी चार ठेवावीत.
१) कुलदेवता (कुलदेवतेचे नाव) भक्त असे म्हणून नाव लिहावे.
२) बारा महीन्यांची बारा नावे पुढीलप्रमाणे आहे.
१. कृष्ण, २) अनंत, ३) अच्युत, ४) चक्री, ५)वेंकुठ, ६)जनादन, ७) उपेंद्र, ८)यज्ञपुरुष, ९) वासुदेव, १०) हरि, ११) योगीश, १२) पुंडरीकाक्ष
याप्रमाणे नामकरण संस्कार होतो.

1 comment: